बातम्यामहाराष्ट्र

मंत्रीपद आणि कार्य़कर्त्यांना महामंडळावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एका जागेसाठी युती तोडणार नाही-आठवले

महाड -देशात मागील पाच वर्षांत मोदी सरकारने अनेक बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. दलितांचे आरक्षण, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे स्मारक हे प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोडवले आहेत. त्यामुळे फक्त एका जागेसाठी हट्ट करण्यापेक्षा आरपीआयला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद आणि कार्य़कर्त्यांना महामंडळावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एका जागेसाठी युती तोडणे योग्य नसल्याची भूमिका आरपीआय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये बोलताना आठवलेंनी युती सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. विधानसभेची बोलणी झाली आहे. विधानसभेला काही जागा मिळतील तसेच विधानपरिषदेचीही जागा मिळेल त्यामुळे पक्षाने नरेंद्र मोदी यांना धोका देणे योग्य नसून योग्य विचार करुन हा निर्णय घेतला असल्याचे आठवले म्हणाले.

दरम्यान, भाजपाला २८५ जागा मिळतील आणि एनडीएचेचे ३२५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

Share this: