नवख्या अभिनेत्याला थेट दिल्लीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मतदारांनो आपली आहे-श्रीनिवास पाटील

भोसरी (वास्तव संघर्ष) शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी येथील रामस्मृती लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी डाॅ. अमोल कोल्हे यांच्याविषयी मत व्यक्त केले ते म्हणाले, संभाजी मालिकेतील अभिनेता ते थेट खासदारकीपर्यंत नवखा असलेले डॉ. अमोल कोल्हे घराघरांत पोहचलेले आहे. या नवख्या अभिनेत्याला थेट दिल्लीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मतदारांनो आपली आहे. ही जबाबदारी आपण पार पाडाल. नवखा आहे पण, हवाय या सूत्रांनुसार कामाच्या तयारी लागा

ते पुढे म्हणाले, शेतकरी जोंधळ्याची निगा राखताना, वारा आल्यावर घरी जात नाही, ताटवं पडू नये यासाठी, ताटव्याच्या बुडाशी माती लावण्याचे काम करतो. मतदाराच्या बाबतीतही आम्हाला हीच काळजी घ्यावी लागेल. चुकीच्या विचारांची वादळे त्याच्या मनात येवू लागली, कि त्याला सावरता आले पाहिजे. मतदारांनो जागे व्हा, विचार परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. विचार परिवर्तन करा आणि उमेदवाराला निवडून द्या.

यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी, नगरसेविका विनया तापकीर, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, चंद्रकांत वाबळे, अरुण बो-हाडे, अॅड. गोरक्ष लोखंडे आदी उपस्थित होते. नगरसेविका अनुराधा गोफणे, विनया तापकीर, अरुण बो-हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी यांनी नियोजन केले होते

Share this: