‘तब्बल पाच वर्षांनी निगडी विभागात पाऊल ठेवणा-या खासदारांचे सहर्ष स्वागत!

उपरोधिक फलकाद्वारे खासदारांचे अनोखे स्वागत

पिंपरी (वास्तव संघर्ष) तब्बल पाच वर्षांनी निगडी विभागात पाऊल ठेवणा-या खासदारांचे सहर्ष स्वागत!’ असा आशयाचा फलक निगडी येथील अंकुश चौक येथे लावून खासदारांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले आहे.

लोकसभेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे.तस तसे विवीध पक्षातील उमेदवार हे मतदारांच्या गाठी भेटी,प्रचार सभा,दौरा अशा विवीध माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यातच शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा निगडी येथे आज दि.०४ एप्रील रोजी नियोजीत दौरा आयोजित करण्यात आला असल्याने काल रात्री अज्ञातांनी निगडीतील अंकुश चौकात फलक लावत खासदारांना इतके दिवस कुठे गायब होता?तरीही पाच वर्षांनी निगडी विभागात येणा-या खासदारांचे स्वागत! असा फलक लावत खासदारांना उपरोधिक टोला लगावला आहे.तर सदर फलक लागल्याची माहिती मिळताच स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तो फलक काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Share this: