मायावती यांनी लग्न केले तर त्या नरेन्द्र मोदींवर टीका करु शकतात-रामदास आठवले
वास्तव संघर्ष आॅनलाईन – राजकीय फायद्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पत्नीला सोडलं, ते महिलांचा सन्मान कसा करणार? असा प्रश्न विचारत मायावतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीका केली होती. याच टीकेला रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे..
मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल तसेच मायावती यांनी लग्न केले तर त्या मोदींबाबत बोलू शकतात असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील भेलुपूर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.
Union Minister Ramdas Athawale: Mayawati is making remarks about Modi Ji & his wife. She (Mayawati) is not married, she doesn't know what a family is, had she been married she would have known how to handle a husband. We respect Mayawati, she should not make such statements. pic.twitter.com/fGCIb9nuZW
— ANI (@ANI) May 17, 2019
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लग्न झालं आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मायावतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करायला नको होती असंही आठवले यांनी म्हटलं आहे