बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘ खरं प्रेम कधीच संपत नाही…’फेसबुकवर पोस्ट टाकून तरुणाने केली आत्महत्या

पिंपरी :-फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशलमिडीयावर पोस्ट करून पुण्यात एका तरुणाने इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. समीर एकनाथ भसे (वय- २५ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. समीरने आपल्या सोशलमिडीयाच्या अकाऊंटवरुन’ खर्‍या प्रेमाचा शेवट नसतो, कारण खरं प्रेम कधीच संपत नाही…’ अशी टॅगलाईन देऊन पोस्ट केली होती तसेच वाढदिवसाचा केक, चॉकलेट आणि अंगठीचे फोटोही पोस्ट केले आहेत. यावरून समीर याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. समीर दुचाकीवरून इंद्रायणी नदीच्या पुलावर आला होता. तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता. त्यानंतर मात्र काही क्षणातच त्याने पुलावरून थेट इंद्रायणी नदीत उडी घेतली. नदीवर काही अंतरावर काहीजण मासे पकडत होते, त्यांनी आरडाओरडाही केला.

मात्र तोपर्यंत समीर पाण्यात दिसेनासा झाला. एनडीआरएफच्या पथकने तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर समीरचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफ यश आले. सायंकाळी पाचच्या सुमारास समीरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला

Share this: