महाराष्ट्र

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वात मुंबईत रॅली

मुंबई (वास्तव संघर्ष) – सुधारित नागरिकत्व कायदा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नसून अन्य कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही त्यामुळे या कायद्या बद्दल विरोधक पसरवीत असलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. रिपब्लिकन पक्ष ; केंद्र सरकार भारतीय मुस्लिमांच्या पाठीशी आहे. अशी ग्वाही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रविवारी रिपाइंतर्फे बांद्रा पूर्वेतील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात ‘आय सपोर्ट सीएए रॅली ‘चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मुंबईतील रिपाइं कार्यकर्ते मोठया संख्येने सामील झाले होते. रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ.सीमाताई आठवले; काकासाहेब खंबाळकर ; गौतम सोनवणे; शिलाताई गांगुर्डे; अनिल गांगुर्डे; ऍड. आशाताई लांडगे; मुस्तक बाबा ; उषाताई शेजवळ; सिद्धार्थ कासारे; विवेक पवार ,किसन रोकडे , रतन अस्वारे; नागेश तांबे; हेमंत रणपिसे ,संजय खंडागळे,अमित तांबे आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सुधारित नागरिकत्व कायद्याला लोकशाही मार्गाने संसदेत मंजुरी मिळाली असून हा कायदा देशाच्या हितासाठी आहे. देशातील मुस्लिमांच्या
विरोधात किंवा अन्य कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात हा कायदा नाही. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात समाज विघातक शक्तींकडून होणाऱ्या अपप्रचाराला बळी पडू नका.नागरिकत्व सुधारणा कायदा देशाच्या हिताचा असल्याने रिपाइं तर्फे या कायद्याचे समर्थन करण्यात आले असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.

Share this: