बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस नेत्यांनी आई-बापांचे स्मारक उभे केले पण, संविधानाच्या बापाला स्मारकासाठी जागा दिली नाही – मुख्यमंत्री

वास्तव संघर्ष

नागपूर : भाजपच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले , भाजप सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे. २०२० ला हे स्मारक पूर्ण होईल,  असा विश्वास  त्यांनी यावेळी व्यक्त केला.   भाजपाचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाला जागा मिळाली. तसेच  मोठ्या प्रमाणात निधीही मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण भारतीय संविधानाच्या बापाला म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाआघाडीवर तोफ डागली. हे सर्व पक्ष परिवाराचे पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांना सत्तेत बसवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबीतून आलेले आहेत. त्यांना गरिबांचे दु:ख माहीत आहे. मोदींनी उज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत गॅस नेला. प्रत्येकाच्या घरी वीज पोहोचवण्यात आली, असे ते म्हणाले

Share this: