बातम्यामहाराष्ट्र

संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे ; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू-खासदार संभाजीराजे

वास्तव संघर्ष आॅनलाईन :-. आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत . आम्हाला गृहित धरु नका, कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका आणि संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे . गरज पडेल तेव्हा तलवारी काढू , असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला आहे .

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूरमधून सुरुवात झाली.खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते . मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे . केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही असाही आरोप संभाजी राजेंनी केला आहे . आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका . आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिले आहे . राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं .

Share this: