बातम्यामहाराष्ट्र

कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने कितीही यात्रा काढून बोंबलू दे, लोक म्हणतात आम्ही भाजपलाच मतदान करणार

सांगली: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने कितीही यात्रा काढून बोंबलू दे, लोक म्हणतात आम्ही भाजपलाच मतदान करणार. आतापर्यंतच्या निवडणूक निकालांवरून हे दिसले आहे.या निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा जोरदार टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला.दख्खन यात्रा महोत्सवानिमित्त आले असताना ते बोलत होते.

कॉंग्रेसने जनसंघर्ष तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने परिवर्तन यात्रा काढून भाजप सरकारवर टीका सुरू ठेवली आहे. त्यावर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, या पक्षांनी कितीही यात्रा काढल्या तरीही सामान्य माणसाला भाजपचा फायदा होत आहे.

त्यामुळे एकाही निवडणुकीत भाजप पराभूत होत नाही.विरोधकांच्या यात्रा कार्यक्रमातून आम्हाला वेगवेगळ्या यात्रांची नावे तरी कळली, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या वेगवेगळ्या यात्रांतून ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन भाजपविरोधात टीकेची झोड उठवण्यास सुरूवात केली आहे. त्यासंदर्भातच महसूलमंत्री पाटील यांनी हे उत्तर दिले आहे

Share this: