बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोरोनाच्या भितीने चिंचवड स्मशानभूमीत मृतदेह चितेवर ठेवताच पळाले नातेवाईक 

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष ) – एखादा शञू जरी मृत्यू झाला तरी शञूत्व सोडून लोक त्याच्या अत्यंसंस्कारासाठी जातात. कारण हीच आपली संस्कृती आहे. माञ देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यातच आता पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे आणि शहरातील मृत्यूचा आकडा नऊपर्यंत गेला असून त्यापैकी चार हे शहरातील असून उर्वरित पाच हे शहराबाहेरील आहे. काल पुण्यातील कासेवाडी येथील राहणा-या 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो रूग्ण पिंपरीतील काळेवाडी याठिकाणी आपल्या भावाकडे  आला होता त्या दरम्यान त्याला ञास सुरू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

या करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतशरिराची खरी हेळसांड झाली. कोरोनाच्या  संकटामुळे रक्‍ताची नाती कशी दुरावत असल्याचे काल पहायला मिळाले. करोना हा साथीचा आजार आहे. या आजाराने मृत्यू झाल्यावर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात देतात. महापालिका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत मयत व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार केले जातात. जर मयत व्यक्‍तीला कोणीच नातेवाईक नसल्यास त्याच्यावर वायसीएम प्रशासनाकडून अंत्यसंस्कार केले जातात. परंतू नातेवाईक असूनही त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. मुलगा आणि भाऊ या दोघांनीच दीडशे फूट लांबून अंत्यदर्शन घेतले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची वाट न पाहता स्मशानभूमीतून त्यांनी काढता पाय घेतला. अखेर वायसीएममधील कर्मचाऱ्यांनी जीवावर होऊन कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसताना अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले.

करोना बाधिताचा मृत्यू झाल्यावर त्याचा भाऊ आणि मुलगा सकाळी सहा वाजता पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात दाखल झाले. मात्र त्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. प्रशासनाने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे, अशी त्यांची मागणी होती. तर नातेवाईक असल्याने असे करता येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते कॉंग्रेसचे पदाधिकारी मनोज कांबळे यांच्या पुढाकाराने हालचाली सुरू झाल्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत मृतदेह शवागृहात पडून होता. अखेर आयुक्‍तांनी आदेश दिल्यावर प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी हालचाली सुरू केल्या.

मृतदेह दुपारी लिंकरोड, चिंचवड येथील स्मशानभूमी रुग्णवाहिकेतून आणण्यात आला. त्यावेळी नातेवाईक दीडशे फूट लांब उभे होते. मृतदेह रुग्णवाहिकेतून खाली काढण्यासाठी मदत करा, अशी विनवणी रुग्णवाहिकेसोबत आलेला कर्मचारी करीत होता. माझ्याकडे असलेले पॅक हॅन्डग्लोज तुम्ही घाला, मी तसाच मृतदेह उचलतो, अशीही विनवणी तो कर्मचारी नातेवाईकांना करीत होता. तरीदेखील रक्‍ताच्या नात्याला पाझर फुटला नाही.

“तुम्हीच सगळे करा, आम्ही लांबून पाहतो’, असे नातेवाईकांनी सांगितले. पीपीई किट किंवा इतर आवश्‍यक सुरक्षिततेची साधने नसतानाही रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून तो विद्युत दाहिनीकडे नेला. त्यानंतर स्मशानभूमीत आलेले नातेवाईक अंत्यसंस्काराची वाट न पाहता कर्मचा-यांने मृतदेह विद्युदाहिनी वर ठेवताच नातेवाईक पळून गेले.
नातेवाईक नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे की नाही, असा प्रश्‍न रुग्णवाहिकेसोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना पडला. मृतदेह जाळलाच नाही, असा आरोप नातेवाईकांनी केल्यास काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. मात्र त्यावेळी तिथे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या कर्मचाऱ्याची समजूत काढल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this: