बातम्या

पिंपरीत दोन टोळ्यांमध्ये तुफान मारामारी 

पिंपरी (वास्तव संघर्ष) : दोन टोळक्यांमध्ये किरकोळ कारणावरून बेदम मारामारी करण्यात आली आहे . यात काहीजण जखमी झाले असून या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना सोमवारी (दि.1) रात्री दहा वाजता पिंपरी येथे घडली.

ऋषीकेश सचिन जमदाडे (वय 19 रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली असून सिद्धार्थ वाघमारे (रा.पिंपरी), आशिष पाल (रा.पिंपरी), रितेश किर्ते व त्यांचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर रितेश याने दिलेल्या फिर्यादित ऋषिकेश जमदाडे, अविनाश प्रकाश माने, अक्षय केशव आम्ले व त्यांचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र अक्षय केशव आम्ले, अविनाश माने हे रितेशच्या घरी गेले. तेथे त्यांनी रितेशच्या आईला त्याला समजावून सांगण्यास सांगितले. यावरून रितेश याने चिडून फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत बसला असताना तेथे आला. त्याच्यासोबत त्याचे साथीदारही होते. त्यांनी फिर्यादिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादीच्या पाठीत डोक्यात मारले. डोक्यातून रक्त आल्यानंतर त्यांनी मारणे थांबवले फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली

तर रितेश याने दिलेल्या फिर्यादीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून ऋशिकेष याने रितेशला कोयत्याच्या मुठीने मारहाण केली,तसेच फिर्यादीचा मित्राच्या गाडीची तोडफोड केली.  यामध्ये फिर्यादी व त्याचे मित्र जखमी झाले आहेत.पिंपरी पोलीसांनी दोन्ही तक्रारी दाखल केल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत

Share this: