महाराष्ट्रातील मातंग समाजाने भाजपाला मतदान करू नये- युवराज दाखले
पिंपरी-कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे कारण पुढे करीत, अण्णाभाऊ साठे महामंडळ भाजपाने बंद केले आहे. हा सत्ताधाऱ्यांचा मातंग समाजावर केलेला अन्याय आहे. तसेच सध्याचे भाजप सरकार आपल्या मातंग समाजासाठी कोणतेच प्रयत्न करीत नसल्याचे दिसुन येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी असल्याची मातंग समाजाची भावना तयार झाली आहे. त्यामुळे अंखड महाराष्ट्रातील मातंग समाजाने भाजपाला मतदान करू नये, असे शिवसेना तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.