बातम्यामहाराष्ट्र

मी जोपर्यंत शरद पवार यांच्याबरोबर नाही तोपर्यंत बौद्ध समाज त्याच्याकडे येणार नाही – रामदास आठवले

वास्तव संघर्ष आॅनलाईन मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कितीही प्रयत्न केला तरी बौद्ध समाज त्यांच्यासोबत येणार नाही. जोपर्यंत मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष शरद पावर यांच्यासोबत येत नाही तोपर्यंत समाज त्यांच्या सोबत येणार नाही, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आंबेडकरी जनतेचे मतदान राज्यात निर्णायक आहे. आंबेडकरी जनतेचा कौल ज्यांना मिळतो त्यांनाच सत्ता मिळते. आंबेडकरी जनतेचा कौल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला मिळाला आहे, असे नमूद करून आठवले म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या उमेदवारांना आंबेडकरी बौद्ध जनतेची मते मिळाली नाहीत म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. म्हणून त्यांचे मत योग्य आहे, पण त्यांनी कितीही प्रयत्न केलातरी आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांच्याकडे आता वळू शकत नाही. मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष जेव्हा शरद पवारांबरोबर होता तेव्हा आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांना मिळत होते.

Share this: