बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

निगडीतील “डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार” चे काम त्वरित पूर्ण करा-प्रमोद क्षिरसागर

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नं 22 येथे नव्याने निर्माण होणारी विश्वरत्न ” डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार” या कामास 2 वर्ष पूर्ण होत आहेत. अद्याप काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे गेली 2 वर्ष सदर भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढा काळ विलंब करण्याचे काहीएक कारण नाही.

याच प्रवेशद्वारातून कोरोनात मृत्यूमुखी पडलेले शव स्मशानभूमीत आणले जाते. मात्र प्रवेशद्वाराचे काम रखडल्यामुळे येथे येणारे शव ज्या ठिकाणी प्रवेशद्वाराचे काम चालू आहे. त्यामुळे शववाहिकाना स्मशानभूमित जाण्यासाठी नागरी वस्तीतून व वर्दळीच्या मार्गाने जाण्यास भाग पडत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे काम त्वरित पूर्ण करावे यासाठी लढा युथ मुव्हमेंट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की विश्वरत्न “डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारा” च्या कामाचे राजकारण करून नागरिकांना वेठिस धरण्याचे काम कोणीही करू नये व नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. या बाबत परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या पंधरा दिवसात प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करून मार्ग खुला करावा. यावेळी लढा यूथ मूव्हमेंट चे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, अमित गोरे, बुद्धभूषण अहिरे, भैय्यासाहेब ठोकळ, पंकज धेंडे, सिद्धार्थ मोरे, गौतम कांबळे आदी उपस्थित होते.

Share this: